मंगळवार, १९ मार्च, २०१३


इंटरनेट निरक्षरता
--------------------------

"खरं तर मी इंटरनेटच्या क्षेत्रात पूर्ण निरक्षर माणूस आहे, पण या गोष्टींचे फायदे काय याची मला पूर्ण कल्पना आहे. एक तर इंटरनेटमुळे कागद लागत नसल्यामुळे ते पर्यावरणपूरक माध्यम आहे. त्यामुळे मी सुरुवातीपासूनच ई-रीडिंग, ई-बुक अशा नव्या माध्यमांमधल्या सहभागाला कायमच होकर देत आलो आहे, आताच्या ई-संमेलनाचं अध्यक्षपद स्वीकारण्यासही मी त्या कारणानेच होकार दिला आहे. अशा उपक्रमांची वाढ होणं ही चांगलीच गोष्ट आहे."-----तिसर्‍या मराठी ई-साहित्य-संमेलनाचे अध्यक्ष : नेमाडे

आता स्वत: नेमाडेंनीच कबूलल्याप्रमाणे ते निरक्षर असल्याने आपणच इंटरनेटने खरेच फायदा होतो का हे पहायचे ठरवले तर काय कळते ? इंटरनेट हे फुकटचे आहे असे वाटणे पटणारे नाही. कारण इंटरनेट जोडणीसाठी दर महिन्याला कमीत कमी २५०/३०० रुपये मोजावे लागतात. शिवाय त्यात GB ची जी मर्यादा असते ती ओलांडली तर ज्यास्तीचा खर्च येतो. संगणक चालवायला शिवाय वीज लागते. ही वीज किती लागत असावी ? आपल्याला जे दर महिन्याचे विजेचे बिल येते त्यात एसी ,गीजर, फ्रिज, टीव्ही, लाईट व संगणक ह्या उतरत्या श्रेणीने संगणक शेवटी असल्याने खुष व्हायचे कारण नाही, कारण संगणकांची एकूणातली संख्या प्रचंड मोठी आहे. अमेरिकेत गेलो असताना, सॅन होजे येथे एक इमारत ३२ मजल्याची दाखवण्यात आली जी गुगल कंपनीची एक डेटा-सेंटरची इमारत होती. त्यात म्हणे मोजकीच माणसे, पण प्रचंड संगणकीय आयुधे असतात. अशा अनेक कंपन्यांचे डेटा सेंटर्स असतात. सगळ्य़ांचे मिळून कैक हजार . ह्यांना एकूणात वीज किती लागते?  तर गुगल आता स्वत: वीज निर्मितीच्या क्षेत्रात उतरली आहे त्यावरून किती वीज लागते त्याचा अंदाज यावा .
आता खालचा व्हिडीओ पहा. तो सांगेल की किती प्रचंड वीज लागते इंटरनेटला आणि ते किती पर्यावरण ढवळते ते. आता नेमाडेंचे खरे की ह्या व्हिडिओतले ? पहा बुवा ! मी तर नेहमीच नेमाडेंच्या विरोधात असतो !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा