बुधवार, १६ मार्च, २०११

भैरप्पा व नेमाडे--एक तौलनिक अभ्यास:

भाषा व ज्ञानपीठे:
भैरप्पांची मूळ "दाटू" ही कन्नड भाषेत आहे तर नेमाडेंची "हिंदू" मराठीत आहे. ( तसे नेमाडेंचे शिक्षण इंग्रजी विषयात झालेले असले तरी ते आवर्जून कादंबरी मराठीतच लिहितात हे कौतुकाचे आहे.). कन्नड भाषेत आतापर्यंत सहा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले आहेत, मल्यालमला आठ, तर मराठीत फक्त तीन. तुकारामाने वर्णन केल्याप्रमाणे मराठीने कानडी नवरा केला तर फजीती होते, तसेच मराठी कानडी प्रादेशिक वाद अजून सुटलेले नाहीत. ह्यावरून कोणती भाषा श्रेष्ठ ते ठरवणे अवघड. त्यामुळे भाषेच्या एकमेकापेक्षा वरचढ असण्याचे आपल्याला काही निकष लावता येत नाहीत व तशी तुलना रास्त होत नाही.
ज्ञानपीठे किती मिळालीत त्यावरून भाषेच्या श्रेष्ठत्वाची तुलना करता येत नाही, असे असले तरी वस्तुस्थितीची मात्र तुलना होऊ शकते. त्यामुळे दोन्ही वाचकांनी आपापले रास्त अभिनिवेष जपायला हरकत नसावी. दोघेही स्वत:ला वाखाणणू शकतात. कदाचित कन्नडिगांना जरा ज्यास्त अभिमान असेल, ज्यास्तीच्या ज्ञानपीठांमुळे !
वाचनीयता वा रमणे ( इंटरेस्ट ) ह्या निकषावर "दाटू" किती तरी पटीने ज्यास्त वाचनीय व रंजक आहे तर "हिंदू" वाचायला अतिशय अवघड जाते, वाचवल्या जात नाही. आतापावेतो शंभर जणांनी ती वाचलेली आहे असे मला कळवलेले आहे. पण ह्या पैकी ८० जणांनी ती केवळ पहिली ७०/८० पानेच वाचू धजलो, पुढची वाचूच शकलो नाही असेही कबूलले आहे. एका ग्रंथपालाने तर सुरुवातीचा खप पाहता आम्ही खूप प्रती मागवल्या असे सांगितले पण आजकाल कोणी ही कादंबरी मागतच नाही असेही सांगितले. असे असले तरी "हिंदू" बरीच खपली हे मान्यच करावे लागेल. त्यामानाने "दाटू"च्या आवृत्या ज्यास्त झाल्या असतील, ती ग्रंथालयातून अजूनही ज्यास्त मागणीची असेल पण मार्केटिंगच्या बाबतीत जितका बोभाटा "हिंदू"चा झाला तितका "दाटू"चा झाला नाही.
शिवाय "हिंदू" प्रसिद्धीनंतरच्या काळातच नेमाडेंना पद्मश्री हा किताब मिळाला हेही नजरेआड करता येत नाही. असा कुठला किताब प्रसिद्धिनंतर भैरप्पांना मिळालेला नाही. त्यांना साहित्य अकादेमीचा पुरस्कार मिळालेला आहे तर नेमाडेंना महाराष्ट्र फौंडेशनचा . तसे जातीच्या तुलनेत पाहिले तर दोघेही आजकालच्या वजनदार जातीचे ( सत्ताधार्‍यांना योग्य वाटणार्‍या जातीचे ) लेखक आहेत व त्यात तुल्यबळ आहेत हेही निर्विवादच आहे.
पार्ल्याला देशीवादावरच्या भाषणादरम्यान एका प्रश्नाला उत्तर देताना नेमाडे म्हणाले की मराठी पुस्तकांच्या विक्रीतून असे कितीसे पैसे सुटतात ? त्यामुळे खपाच्या दृष्टीने त्यांनी ह्या कादंबरीत काही क्लृप्त्या केलेल्या नाहीत. तरीही जर कोणाला ही कादंबरी आवडली नसेल तर ते त्या प्रतीचे पैसे परत द्यायला तयार आहेत. भैरप्पांनी अशी काही सोय जाहीर केलेली नाही. हाही प्रसिद्धीपश्चात व्यवहारातला महत्वाचा फरक म्हणता येईल.
( समाप्त )

--------------------------
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

३ टिप्पण्या:

  1. इंग्रजीत विचारवंत म्हणवून घेण्यासाठी हिंदूसारखे चोपडे पुरेसे होणार नाही म्हणून त्यानी हिंदू मराठीत लिहिली.

    उत्तर द्याहटवा
  2. puraskaranwarun sahityakrutinche mulyamapan howu shakat nahi. bhairappa yanchi aawaran hi kadambari mi wachali. khupach prabhawi lekhan ahe tyanche.

    उत्तर द्याहटवा