मंगळवार, ५ ऑक्टोबर, २०१०

नेमाने नेमाडे--३
राष्ट्रपित्याशी पंगा !
आपल्याच बापाला शिव्या घालायच्या म्हणजे प्रचंड धैर्य लागते. तशी जिगर लागते. पण एकदा बापालाच घाणेरड्या शिव्या हासडल्या की मग कोणी आपल्या वाटेला धजत नाही. मग महात्मा गांधी भले राष्ट्राचे पिता असले तर त्याचे काय हो ?
पृ.२५३, हिंदू मध्ये हे पहा :
"शांतता चिरणारा बनी रांड हिचा कोळीवाडयातून धारदार आवाज...पन तू कोनता सत्वाचा हायेस महात्मा गांधीच्या लवडयाचा ते पाहतेच मी बी, तुह्या बहीनचा झौ...तोंडाची गांड करतूस..."
साहित्यिकांना रांडेचे अप्रूप असणे समजू शकते ( कारण बहुतेकांच्या धर्मपत्न्या सोडून गेलेल्या असतात ). पण हे पात्र काही "ब्राह्मणांनी हिंदु धर्म बिघडवला" ह्या मध्यवर्ती "निश्चित नैतिक’ भूमिकेशी फारसे जवळचे नाही. शिवाय कायम हरिजनांचा कैवार घेणारे महात्मा गांधी काही लेवा पाटिलांच्या विरोधातले नव्हते. बरे एखाद्या रांडेने पैसे न देणार्‍या कादंबरीकाराला अशा शिव्या हासडल्या तर ते क्षम्य करता येईल. पण तिने डायरेक्ट महात्मा गांधीलाच हात लावावा हे असंभव व अर्वाच्य !
महात्मा गांधींवर अनेकांनी टीका केलेली आहे. पण ही अगदी खालच्या पातळीची तळ गाठते.
महात्मा गांधींचे चित्र असलेला साहित्य अकादेमीचा पुरस्कार घ्यायला आता नेमाडे मोकळे आहेत !
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा