शुक्रवार, ३१ डिसेंबर, २०१०

भैरप्पा व नेमाडे--एक तौलनिक अभ्यास

विद्रोह व बहु-आवाजी रेखाटन:
आता बंडखोर प्रवृत्तीचं द्योतक असलेलं एक उदाहरण पाहू. विद्रोहाला भडक रंग द्यावा, मग दिसण्याची तमा बाळगू नये, असे जणु धोरणच असलेले नेमाडे (पृ.२५३) वर एक प्रसंग असा रेखाटतात : "शांतता चिरणारा बनी रांड हिचा कोळीवाडयातून धारदार आवाज...पन तू कोनता सत्वाचा हायेस महात्मा गांधीच्या लवडयाचा ते पाहतेच मी बी, तुह्या बहीनचा झौ...तोंडाची गांड करतूस..."
आपल्याच बापाला शिव्या घालायच्या म्हणजे प्रचंड धैर्य लागते. तशी जिगर लागते. पण एकदा बापालाच घाणेरड्या शिव्या हासडल्या की मग कोणी आपल्या वाटेला धजत नाही. मग महात्मा गांधी भले राष्ट्राचे पिता असले तर त्याचे काय हो ? साहित्यिकांना रांडेचे अप्रूप असणे समजू शकते ( कारण कुणाकुणाच्या धर्मपत्न्या सोडून गेलेल्या असतात ! ). पण हे पात्र काही "ब्राह्मणांनी हिंदु धर्म बिघडवला" ह्या मध्यवर्ती "निश्चित नैतिक’ भूमिकेच्या फारसे जवळचे नाही. शिवाय कायम हरिजनांचा कैवार घेणारे महात्मा गांधी हे काही लेखकाच्या वा नायकाच्या जाती विरोधातले नव्हते. बरे एखाद्या रांडेने ठरलेले पैसे न देणार्‍या कादंबरीकाराला अशा शिव्या हासडल्या तर ते क्षम्य करता येईल. पण तिने डायरेक्ट महात्मा गांधीलाच हात लावावा हे असंभव व अर्वाच्य ! महात्मा गांधींवर अनेकांनी टीका केलेली आहे. पण ही अगदी खालच्या पातळीची तळ गाठते. रांडेचे चित्रण वास्तवादी करण्यासाठी तिने शिव्या देणे क्षम्य असले तरी तिने थेट महात्मा गांधींनाच शिव्या देणे अनावश्यक आहे. अर्थात रांडात पक्षीय अभिनिवेश असतो असे लेखकाला सूचित करायचे असेल तर मग हे चित्रण पुरेसे केलेले नाही असेच म्हणावे लागेल. महात्मा गांधींचे चित्र असलेला साहित्य अकादेमीचा पुरस्कार घ्यायला मात्र आता नेमाडेंना अमळ अवघडच जाणार आहे !
भैरप्पांच्या कादंबरीत महात्मा गांधींचे शिष्य राहिलेली दोन पात्रे आहेत. एक बेटटया व दुसरे मंत्री. मुख्य पात्र असलेल्या सत्या हिचे वडील आपली मुलगी (जी ब्राह्मण आहे), लिंगायतांच्या घरात लग्न करते आहे, त्याने व्यथित झालेले असतात. त्या वेडाच्या भरात ते तिला वहाणेने बेदम मारतातही. चूक समजल्यावर स्वत:लाही चपलेने मारून घेतात. त्यांना समजावयाला आलेल्या त्यांच्या हरिजन मित्राला ( बेट्टयाला ), ते इथे (पृ. १७३ ) पहा कसे बोलतात: "काय केलंत हे ? स्वत:च्या देहाला केली तरी हिंसा, हिंसाच नाही का ? महात्मा म्हणत होते---"."तुझ्या महात्म्याचं इकडं काही सांगू नकोस. पित्त खवळलेला म्हातारा तो ! एवढ्या जखमांनी काही होत नाही. माझ्या मुलीची हकीकत सांग-- म्हणत ते त्याच्या पासून दोन हात अंतरावर बसले". संयमित अविष्कार करीत महात्म्याचा विरोध नोंदवणे हे अवघड काम भैरप्पा इथे अपार कौशल्यानं करीत आहेत. उगाच माथे भडकवणारे शब्द न वापरता ! असेच एका क्रांतीकारी पात्राच्या तोंडी ( पृ.२०८) गांधीविरोधातले हे वक्तव्य पहा: "शिकत असताना सांगितलेलं ऐकत होता तो. आता त्याची वेगळीच लाईन झाली आहे. महात्मा गांधींचं किंवा अहिंसेचं नाव काढलं तर रागानं फणफणतो नुसता ! आता तो क्रांती-आंबेडकर म्हणत असतो. मला तर त्याची काळजीच वाटते." शेलक्या शिव्या न वापरता किती नेमकेपणाने भावना व्यक्त होताहेत इथे. असाच वस्तुपाठ भैरप्पा पृ.२५३ वर असा घालून देतात: "--छे ! असं नाही त्या विचारात गुंतणं बरं नव्हे. आहे त्या परिस्थितीत काय करता येईल हे पाहिलं पाहिजे. अकबरानं राजपूत राजकन्यांनी आपला जनानखाना भरला आणि तो एवढा मोठा सम्राट झाला म्हणे. पण हे लोकसत्ताक राज्य म्हणजे---इतिहासाशी तुलना करता करता त्यांच्या तोंडून इरसाल शिव्या उधळल्या जात." शिव्यांचा वर्षाव न करता भैरप्पा तोच परिणाम इथे कसा साधतात हे पाहणे कौतुकाचे आहे. बख्तिन ह्या समीक्षकाने म्हटल्याप्रमाणे सत्य हे जर बहु-आवाजात वसत असेल तर अशा बहु-आवाजांचा कोलाहल ( कार्निव्हल ) वाटेल तितपत चित्र रेखाटणे हे कादंबरीकाराचे एक कसबच म्हणायला हवे. ह्या दृष्टीने पाह्यले तर नेमाडेंच्या कादंबरीतले आवाज शिव्या देणारे एकसूरी वाटतात तर भैरप्पांच्या "दाटू" त आवाजांचे वैविध्य दिसते. कथानक गांधी ह्या व्यक्तीच्या तत्वांना सहानुभूतीपूर्ण असूनही गांधीविरोधी आवाजही भैरप्पा वर दाखविले तसे देतात. अजून एका ठिकाणी ( पृ.१२०) ते एक प्रवाद असाही देतात: "गांधी वैष्णव जातीचा म्हणे. आपल्या जातीची माणसं ज्यास्त व्हावीत म्हणून त्यानं हा डाव टाकलाय ! मागं रामानुजाचार्यांनीही असंच करून महारा-मांगांना उभं नाम लावून आपल्या धर्मात घेतलं तसं ! लिंगायत मुखंडांनीही आपली शंका व्यक्त केली." विद्रोह व बहु-आवाजी चित्रण असावे तर असे ! ( क्रमश:)

रविवार, १९ डिसेंबर, २०१०

भैरप्पा व नेमाडे: एक तौलनिक अभ्यास:५

दाब व त्यांचे समर्थन :
चुकीचा निष्कर्ष व त्याचे चुकीचे समर्थन ह्याचे एक उदाहरण पाहू. "हिंदू"त जातीयते मुळे जातीजातींचा एकमेकावरचा दाब कसा उफाळून येतो हे दाखवणारा खास नेमाडपंथी वळणाचा एक किस्सा ( पृ.१५६) दिलाय. तो असा :
"एक बुला वेसकर. वेशीखालच्या देवडीत बसलेला. हा ह्याच नावानं विख्यात होण्याचं कारण आजूबाजूला कोणी नाही, हे चाणाक्षपणे पाहून हा एकदम त्याच्या धोतरातली बुल्लीच मुठीत धरून आम्हा पोरांना दाखवायचा. पुन्हा धोतर खाली टाकून साळसूद चेहर्‍यानं काहीच झालं नाही, किंवा काहीच केलं नाही, असं दाखवायचा. हे कोणाला सांगायचं तरी कसं ? याचा अर्थ आपल्याला तेव्हा लागत नव्हता. आता लागतो: सवर्ण हिंदू -अस्पृश्य संबंधाचा तो दृष्टांत होता, कव्हणी एकु कुरवंडी करीत सांता कुरघोडी करी त्या वेसकरीयाचा दृष्टांत. जैसे फ्राइडचा सिद्धांत जातीयतेत मोडून सांगितल्यास जैसे होईल तैसे. किंबहुना ज्ञानेश्वर : ऐसा शिवमुष्टिगुंडु । घेउनु ठाके ॥ अस्पृश्यता एक हजार वर्षांपासून आहेच, तेव्हापासूनचे दाब असे वर येतात. "
ज्ञानेश्वरीच्या अध्याय १३ त ओवी ७१५-७१७ मध्ये विद्या व वय ह्यांच्या उन्मादाने माणुस कसा गर्व करीत छाती काढून चालतो व माझ्यासारखा मोठा कोणी नाही असा शिवभक्तांना असतो तसा गर्व ( शिवमुष्टीगंडु, गुंडु नव्हे) धारण करतो व मग त्याला चांगले बघवत नाही अशा अर्थाच्या ह्या ओव्या मुळात अशा : म्हणे मीं चि येकु आथि । माझा चि घरिं संपत्ति । माझी आचरती रीती । कोण्हासी नाही ॥ नाहिं माझे नि पाडे वाडु । मी चि सर्वज्ञु एकु रूढु । ऐसा शिवमुष्टिगंडु । घेउनु ठाके ॥ व्याधिलेया माणसा । न ये भोगु दाखवुं जैसा । नीके न साहे तैसा । पुढिलाचे ॥ आता ह्यात वेसकराने काय दाखवले त्याचा व का दाखवले त्याचा हा कसा काय दृष्टांत होतो.काव्यात दृष्टांत म्हणजे जे निवेदन केले त्याच्या समर्थनार्थ दुसरे तसेच एखादे उदाहरण देणे. काव्यशास्त्रात दृष्टांत हा अलंकार, व्याख्या करताना, म्हणतात की "विषयाचे वर्णन करून झाल्यावर ती गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचा एखादा दाखला किंवा उदाहरण दिल्यास दृष्टांत अलंकार होतो." इथे मूळ गोम "त्याच अर्थाचा दाखला" ही आहे. ज्ञानेश्वर म्हणत आहेत गर्व, ताठा बाळगू नका. त्याचा अर्थ त्यांनी ताठा दाखवला, असा आपण काढू शकत नाही. काढलाच तर ते अज्ञानाचे वा खोडसाळपणाचे लक्षण होईल. इथे हा वेसकर ब्राह्मणांच्या दारासमोर जाऊन काही दाखवीत नाही आहे. शिवाय कोणाही मानसशास्त्रज्ञाला विचारा, अत्याचाराच्या दाबाची प्रतिक्रिया अशी नसते.शाळेत लहान मुले असा व्रात्यपणा करतात तो अर्धवट लैंगिक कुतुहुलातून असतो.तर पुष्ट्यर्थ फ्राइड ह्या मानसोपचारतज्ज्ञाचा निर्वाळा आहे. जेव्हा कोणी असे वागतो तेव्हा मानसशास्त्र सांगते की ती एक विकृती असून लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न ( अटेंशन डेफिशियन्सी सिन्ड्रोम ) असतो. किंवा क्वचित प्रसंगी, समजा आपण बाथरूम मध्ये टॉवेल न्यायला विसरलो, व पॅसेजमधला वाळत टाकलेला टॉवेल घ्यायला तसेच बाहेर आलो, तर असे अपघाताने होते. काही ठिकाणी ( जसे अमेरिकेत मोठमोठ्या क्लबातून सामूहिक बाथरूम मध्ये) लोक नागडयाने वावरू धजतात. पण बाहेर योग्य कपडे घालूनच येतात. कधी कधी क्रिकेट मॅच दरम्यान कोणी नागडयाने मैदानावर पळतो. त्याला मग पोलीस अटक करतात. ह्या सर्व प्रतिक्रियांमध्ये कुठले दाब उफाळून येण्याचे दिसत नाही. हां, लेखकाने जर कथानकात असे दाखविले असते की हा वेसकर, निवडून, ब्राह्मणांच्या घरांसमोर जाऊन असे करायचा किंवा ब्राह्मण व्यक्ती दिसल्या की त्यांच्या समोर असे करायचा, तर "दाब वर येणे" दिसणे शक्यतेतले होते.त्यामुळे हे अनुमान शक्यतेतल्या कोटीचे वाटत नाही. शिवाय ह्या वेडसर वेसकराने धोतर उचलून जे दाखवले ते लेखक म्हणतो तसे "आम्हा पोरांना"!. त्यात महानुभावी पंथाचे नेमाडे वा नायक खंडेराव व त्यांचे ब्राह्मण नसलेले मित्र आहेत. त्यामुळे हा दाब असलाच तर कुणब्यांच्या विरुद्धचा आहे. ब्राह्मणांच्या किंवा ज्ञानेश्वरांच्या विरुद्धचा अजिबात होत नाही. लेखक हेच पुढे कबूलतो ते असे : "शेतकर्‍यांनी कष्ट करावेत आणि ह्या लोकांनी कणसं खुडून न्यावी ? काय नीतीच्या गोष्टी करता हो. ...शेवटी कुणब्याकडेच खेटे घालतील ना ? " . असा अर्थ काढून दलित व कुणब्यांमध्ये हे लावून देणेही वाईट व निषेधार्यच आहे. कदाचित दलितांच्या लक्षात ही गोष्ट येईलच. शिवाय ज्या अकादेमीच्या मानसन्मानासाठी कादंबरीचा आटापिटा आहे, तिच्या सौंदर्यात काडीचीही अशा कलागतींनी भर पडत नाही.
आता असलाच, ब्राह्मणांविरुद्ध दाब वर येण्याचा, भैरप्पांच्या "जा ओलांडुनी" मधला, ( पृ.२२६) हा संवाद पहा. कथेची नायिका असलेल्या सत्या चा भाऊ ( जो ब्राह्मण व पुजारी असतो ) तो निवडणुकात ब्राह्मण-विरोधात कसा प्रचार करतात ते सांगताना म्हणतो:
"हजारो वर्ष घरात बसून ब्राह्मणांच्या बायकांनी आपली कातडी गोरी करून घेतली आहे, आमच्या बायका उन्हातान्हात शेतात राबून काळ्या झाल्या आहेत. त्या बिचार्‍या बामणांची घरची खरकटी भांडी घासत होत्या. माझ्या हातात आणखी दहा वर्ष सत्ता येऊ दे. बामणांच्या बायकांना आमच्या घरचे केरवारे करून खरकटी भांडी घासायला लावतो, आमच्या शेतांवर उन्हा-तान्हात राबायला लावतो--". आता भैरप्पांच्या कादंबरीचा मूळ रोख, प्रत्येक जात ब्राह्मणासारखे वागायचे प्रयत्न करते, असा वेगळाच असला तरी ब्राह्मण-विरोधाचा प्रसंग वर्णन करताना इथे पहा ते कसे सांगोपांग तर्क देत आहेत. असलेच तर हे खरे "दाब वर येणे " म्हणता येईल. ह्याला फ्राइडचा वरदहस्त नको किंवा ओढून ताणून ज्ञानेश्वरांचे विडंबन करायला नको. शिवाय सगळे कसे सभ्यतेत बसणारे आहे. बरे ह्या कादंबरीला खुद्द साहित्य अकादेमीनेच पुरस्कार दिलेला आहे. म्हणजे ती तुल्यबळ आहेच. भले नेमाडे आता शिकण्यापल्याड असतील पण नवशिक्या कादंबरीकारांना, एखादे विद्रोहाचे कसे वर्णन करावे, व समर्थनाचा पाया कसा मजबूत असावा, त्याचा हा आदर्श असा वस्तुपाठच आहे. (क्रमश: )
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

शुक्रवार, १० डिसेंबर, २०१०

भैरप्पा व नेमाडे:
एक तौलनिक अभ्यास:---५

निवेदन शैली:
बख्तिनच्या हुकुमाबरहुकूम "हिंदू"ची शैली विनोद, विडंबन, त्रागा, असणारी आहे. त्यात गोष्टीवेल्हाळपणा आहे. लोकवाङमायतले पोवाडे, गार्‍हाणे, अभंग, ओव्या, वगैरे असणारे आहे. त्यात उत्क्रांतीच्या कथा आहेत. बोली भाषेचा बाज आहे. नायकाचे निवेदन व इतर वर्णने अप्रतीम भारदस्त प्रमाण भाषेत आहेत. त्यात राजकारणातले नामांतर प्रकरण आहे. मराठवाडा विद्यापीठातले भ्रष्टाचार प्रकरणाचे किस्से आहेत. आधुनिक जागतिक वस्तुस्थिती सांगणारे ( नायकाला कसे सहा महिन्यात अमेरिकेतून व्हिसा संपला की हाकलतात,) शहरीकरणाने नायक कसा विव्हळ होतो, तरी मुलाच्या सोयीसाठी दहिसरला फ्लॅट घेऊन राहतो असे वस्तुस्थितिचे वर्णन करणारे आधुनिकपण आहे. प्रमाणभाषेचा भारदस्तपणा आहे, बोलीचा आभास आहे. बोधपर वचने आहेत, त्राग्याची स्वगते आहेत तर तात्विक चर्चा कराव्यात असल्या विषयांवरची भाषिते आहेत. एकूण नेमाडे म्हणतात तशी शैलीचीही समृद्ध अडगळ आहे.
भैरप्पांची भाषा अतिशय सरळ, बाळबोध, अनलंकृत अशी आहे. त्यात जी अवतरणे येतात ती कथेतली पात्रे जेव्हा श्लोक वगैरे म्हणतात तेव्हाच येतात. भर आहे तो निरनिराळ्या जातींची माहीती, त्यांचे रीतीरिवाजांचे बारकावे, त्यांच्या समजुती वगैरेवर. प्रसिद्ध प्रचलित म्हणी आहेत. इतिहासाच्या अभ्यासानिमित्त इतिहासावरची भाष्ये आहेत. उमा कुलकर्णी ह्यांनी आतापर्यंत ३८ पुस्तकांची भाषांतरे केलेली आहेत तसेच त्यांना बरेच पुरस्कारही मिळालेले आहेत. मुद्रणाच्या अनेक चुका असल्या तरी भाषांतरित भाषा सरळ साधी आहे. भैरप्पांची अशी हातोटी आहे की ते अतिशय बारकाईने व सावकाश वर्णन करतात. नायिका मळ्यात झोपडीत स्वयपाक करते असे दाखवताना चुलीवर ती कशी काटकसर करते, आधी कोणती भांडी घासून घेते, कपडे कसे वगैरे बारकाईचे निरिक्षण असते, त्यामुळे चित्र अगदी रेषा अन रेषाने चितारल्या जाते.
नेमाडेंना स्वत: अलंकारिक भाषा आवडत नाही. प्रमाण भाषा ही बोली भाषा बोलणार्‍यांच्या सहनशीलतेचे उदाहरण आहे , असा त्यांचा लाडका दावा आहे. कदाचित त्यामागे भाषेच्या साधेपणाच्या सौंदर्याचे भान असावे. असाच शैलीचा साधेपणाही भैरप्पांच्या लिखाणात भावणारा आहे. इथे नेमाडेंची अगडबम/भारदस्त प्रमाण शैली ही सरळ शैलीवाल्यांच्या सहनशीलतेचे उदाहरण ठरावे !
नेमाडेंची शैली गुंतागुंतीची, प्रचंड दाहक, व्यवस्थेच्या टोकाच्या विरोधासाठी प्रचंड शिव्या व विडंबन असलेली अशी आहे तर भैरप्पांची शैली सरळ, बाळबोध वळणाची, तरीही विचार प्रबोधन करणारी, अशी आहे. अर्थात ह्यावरून कोणती शैली चांगली व कोणती वाईट हे आपण ठरवू शकत नाही, पण फरक अवश्य जाणवू शकतो.
कादंबरी आत्मचरित्रपर केल्याने नेमाडेंना विश्वासार्हतेचा फायदा जरूर मिळतो पण त्याचबरोबर भैरप्पांची पात्रे जी उदात्ततेचा रंग लेतात ते नेमाडेंच्या पात्रांकडून हुकतेच. कल्पितकथेत नायिका मळ्यावर राहून हवन, शेती, अभ्यास, करू शकते; तिचे पुजारी वडील देवाला दगड म्हणू शकतात, वेडे होऊ शकतात; परत मुलीला वारसाहक्क देऊन आदर्शही होतात. असे नेमाडेंची पात्रे करू शकत नाहीत. त्यामुळे पात्रे वास्तवातली मुळमुळीत, रीतीनिष्ठ, पण लेखकाची व पात्रांची स्वगते मात्र जहाल असा विरोधाभासही जाणवतो. विद्रोहाच्या रंगासाठी नेमाडेंची आत्मचरित्रपर शैली थोडी तोकडी पडते तर भैरप्पांची कल्पितकथा विषयाला न्याय देते. ( क्रमश: )
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

बुधवार, १ डिसेंबर, २०१०

भैरप्पा व नेमाडे
एक तौलनिक अभ्यास:

शहरीकरण व श्रमप्रतिष्ठा:
नेमाडेंच्या कादंबरीत शेतकर्‍यांचे विदारक हालाचे फार चांगले रेखाटन आहे. शेतकर्‍यांच्या दैनंदिन प्रश्नांची हाताळणीही अप्रतीम रेखीव झाली आहे. नायक लहानपणी व नंतर कॉलेजात गेल्यावर सुटीत शेतीची कामे स्वत: करतोही. पण शेती परवडत नाही व त्यातल्या अनंत अडचणींमुळे भयंकर त्रासलेला असतो. तसेच शेवटी शहरीकरणाच्या रेटयामुळे नायकही शहरात येतो, शेतीच्या वाटण्या होतात व त्या नैसर्गिक वातावरणापासून त्याची ताटातूट होते व त्याचे दु:ख त्याला सलत राहते. श्रमाची कामे आता आपण करू धजत नाही व खेडयाचा निसर्ग अंतरला ह्याची त्याला खंत वाटत राहते. ही जाणीव नेमाडे वाचकांपर्यंत फार समर्थपणे पोचवतात. पण ह्यावरचा काही उपाय सुचवत नाहीत. ते त्यांच्याकडे ह्यावर काही "निश्चित नैतिक भूमिका" नसल्याचेच लक्षण आहे. जागतिकीकरणाच्या रेटयाचे वाईट वाटणे हे भावनात्मक असले तरी, नैतिक भूमिकेतून त्याविरुद्धचे तर्क लेखक कादंबरीत देत नाही, हे एक मोठेच अपयश म्हणावे लागेल.
भैरप्पांच्या नायिकेला श्रमाची कामे करण्याचे खूप अप्रूप आहे. ती वडिलांच्या जागी मळ्यात झोपडी बांधून राहते. शेतीतली कामे स्वत: करते. प्रयत्नांनी एका रेषेत नांगर धरायचा सराव करते. (पृ.२३४) वर तिचे मनोगत येते ते पहा: "ती काही बोलली नाही.हातातलं काम संपवून खाली उतरत ती म्हणाली, " मला लग्न करायचं नाही. आपल्या हातानं राबाव असं वाटतं. मला वाटयात फारसा रस नाही. या झोपडीच्या जागी एक छोटंसं घर बांधून दे . शेतीची अवजारं ठेवता येतील एवढं असलं तरी पुरे. आणि एक छोटंसं स्वयंपाकघर. आणखी काही नको.बाकी सगळं तूच पहा." नंतर ती तशीच शेतीची कामे स्वत: करते. हरिजन मित्र-कम-शिष्य असतो त्याला लाकडे फोडून दे म्हणते व तो क्रांतीच्या मनसुब्यापायी ती फोडतोही. इथे श्रमाची प्रतिष्ठा दाखवीत भैरप्पा, ऍन रॅंड च्या फौंटनहेडची आठवण करून देणारी व्यक्तिरेखा चितारतात. पात्रे त्यांच्या कृतीनेच "निश्चित नैतिक भूमिका" दाखवितात.
नेमाडेंच्या कादंबरीत शहरीकरणाची व शेतीच्या श्रमांची,त्या आसमंताच्या विरहाची, खंत आहे तर भैरप्पांच्या कादंबरीत नायिका स्वत: ते जीवन जगत श्रमप्रतिष्ठा व निसर्गसान्निध्याचे दर्शन देते. जाणिवांचा मूळ पोत सारखाच असला तरी नेमाडेंचा खंतीचा रंग आहे तर भैरप्पांचा सकस दाट रंग आहे. ( क्रमश: )
अरुण अनंत भालेराव arunbhalerao67@gmail.com

शनिवार, २७ नोव्हेंबर, २०१०

स्त्रीवादाची जाण व कादंबरी:
जगात निम्मी लोकसंख्या स्त्रियांची आहे ह्या एकाच निकषावर, खरे तर, कोणाही लेखकाची स्त्रीवादाकडे पाहण्याची व तसे चित्रण करण्याची जबाबदारी खूपच वाढते. पण नेमाडेंच्या कादंबरीत स्त्री-पात्रे अगदी वावडे असल्यासारखी, मख्खपणे, वावरतात. एकवेळ नायक खंडेराव लग्न करीत नाही, हा आपण समर्थांचा प्रभाव म्हणून सोडून देऊ.( समर्थांची ते टिंगल-टवाळी करीत असले तरी !) पण कथानकात प्रभाव पाडणारे स्त्रीपात्र नसावे हे "कास्टिंग कौच" चे गौडबंगाल अनाकलनीय आहे. त्यात भर म्हणजे कथानकात जी पात्रे भरपूर पाने व्यापून राहिली आहेत ती आहेत, कामोत्तेजित करणार्‍या "लभान्या" ( किंवा लमाणी स्त्रिया ), गावातल्या झेंडी, बनी रांड वगैरे नावाच्या वेश्या. ह्यांना करून करून किती उदात्त करणार ? दुसर्‍या आहेत, नात्यातल्या आत्या, आजी वगैरे स्त्रिया, ज्यांची हयात व कर्तबगारी घरकाम व रगाडयातच जाते. त्यातल्या आत्या हे पात्र लग्नानंतर लगेच माघारी येते, घरात अडगळीला राहून राब-राब राबते व इतके करून इस्टेटीत तिला वाटा देत नाहीत. नायक खंडेराव ह्याबाबत खंत बाळगतो पण त्याचे परिमार्जन काही करत नाही. अर्थात नायकाने कसे वागावे हा सर्वस्वी लेखकाच्या अखत्यारीतला प्रश्न असला तरी नेमाडे हे निश्चित नैतिक भूमिकेचे श्रेय मिरवणारे असल्याने नायकही तसे वागेल असे वाटत होते. तशात ही आत्मचरित्रपर कादंबरी असल्याने लेखक व नायक हे एकच आहेत असे समजण्यास वाव राहतो. गंमत म्हणजे ते आवर्जून वडिलांनी त्यांच्या डोळ्याच्या इजा (लहानपणी ) होण्यावर घेतलेली काळजी छान रंगवतात पण त्याच जोडीला आईचे काही सांगत नाहीत. ( आणि तरीही त्यांना साने गुरुजींबद्दल, श्यामच्या आईबद्दल, आदर आहे !). कथेत नायक म्हातारा झाल्यावर त्याचा मुलगा त्याला दहिसरला रहा म्हणतो, गावी येत नाही, असे वर्णन येते ( म्हणजे यथावकाश नायकाने लग्न केलेच असणार ). पण ते आपल्या पत्नीचे, नायकाच्या आईचे एक अवाक्षरही काढीत नाहीत. हे एक प्रकारचे स्त्री-तुसडेपण कादंबरीभर मिरवण्याचे प्रयोजन मात्र दिसत नाही, शोभत तर नाहीच.
इतके असूनही रीतीप्रमाणे ("पोलिटिकली करेक्ट") असण्याचा धाक/रेटा असा आहे की स्त्रीवादाचे सेमिनार ते कथेत दाखवतात, त्यानिमित्ताने समर्थ रामदास काय किंवा गौतम बुद्ध काय ह्यांची टवाळी करतात. तसेच काही काही आवश्यक कल्पना, रम्यपणे, पण न फुलवता, नुसत्या उदघोषित करतात. जसे : "स्त्री ही सामाजिक कल्पना आहे की जीवशास्त्रीय ?" असा एक सवाल ते वाचकांना टाकून जातात. एखाद्या शाळकरी विद्यार्थ्याने परिक्षेत प्रश्न सोडवल्या-(अटेंप्ट)-केल्यासारखा, काठावर (पासिंग) मार्क मिळवण्यासारखा हा यत्न राहतो !
भैरप्पांच्या "जा ओलांडुनी" मध्ये नायिकाच मुळी स्त्री असल्याने सर्व विषयच स्त्रीवादी दृष्टीने मांडल्या जातो. ती वडिलांचा ब्रह्मोपदेश घेऊन स्वत: ब्राह्मण होऊन हवन वगैरे सोपस्कार करते, हरिजन मित्राला अत्याचाराविरुद्ध लढताना ऐतिहासिक पुस्तक लिहून देते, वडिलांच्या ठेवलेल्या बाईला व तिच्या मुलाला मदत करते, भावाशी, गावातल्या लोकांशी जातीयतेविरुद्ध भांडते, वैयक्तिक स्वार्थाला टाळून आपल्या प्रियकराचे हरिजन मुलीशी लग्न लावून देते, वगैरे स्त्रीवादाची चित्रे भक्कम रंगतील असे वागते. ह्या प्रत्यक्ष कृतीतून हे स्त्रीवादाचे वागणे स्पष्टच आहे. शिवाय वेळोवेळी ती जी भाष्ये करते ती हेलावून टाकणारी जाणीव निर्माण करतात. जसे:(पृ.१०६)"बायका आणि शूद्र सारखेच. दोघांनाही शिक्षणाचे अधिकार नाहीत. एवढं सगळं घडायला एका दृष्टीनं माझं शिक्षणच जबाबदार. आता माझं काहीच शिक्षण झालं नाही असं समजते. पोट भरायला काहीतरी उद्योग हवा ना." किंवा : ( पृ.२३८)"या देशात समस्त स्त्रिया शूद्रच होऊन राहिल्या आहेत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, सगळ्यांच्या बायका शूद्रच झाल्या आहेत. त्यांना कसलेही अधिकार नाहीत. वेदाध्ययनाचे अधिकार नाहीत, सिंहासनारोहणाचा अधिकारही नाही आणि संपत्तीमध्येही अधिकार नाही. वडील, नवरा, आणि मुलाच्या वर्चस्वाखालीच तिनं राहायला पाहिजे. वेदकाळी असलेलं स्त्रियांचं ब्राह्मणत्व नंतरच्या काळात नष्ट होऊन गेलं. वेदकाळी शूद्रत्वही आज आहे त्या अवस्थेत नव्हतंच. समस्त स्त्रियांना शूद्रत्वाचा शाप केव्हापासून ग्रासू लागला ? याला सुरुवात केव्हा झाली ? कशी झाली ? हाच खरा इतिहास . हेच खरं जीवनदर्शन. हे मी जाणलं पाहिजे. " स्त्रीवादाचा असा पाठपुरावा भैरप्पा सबंध कादंबरीत करतात, जो नेमाडे पूर्णपणे दुर्लक्षितात......................( क्रमश: )

शनिवार, २० नोव्हेंबर, २०१०

भैरप्पा ते नेमाडे
एक तौलनिक अभ्यास:--२

निश्चित नैतिक भूमिका:
कादंबरीतले लिखाण हे प्राय: एक ललित लिखाण व काल्पनिक असते. ( एक सूचना, ("डिस्क्लेमर"), देण्याची प्रथा असते की ही पात्रे व घटना काल्पनिक आहेत व त्यांचे कोणत्याही जिवंत व्यक्तीशी साम्य नाही. साम्य असण्याने कथेच्या संभाव्यतेला वा विश्वासार्हतेला धोका नसतो. फक्त साम्य असलेल्या लोकांचे आक्षेप नको एवढाच ह्यात उद्देश असावा.). पण नेमाडे कबूलतात की ही आत्मचरित्रपर कादंबरी असून आदर्श अशा "यमुनापर्यटन" टाइप कादंबरीत असते तसे, निश्चित नैतिक भूमिका घेऊनच, हे चितारलेले आहे. नेमाडे म्हणतात: "व्यक्ती व समाज ह्यांच्या संबंधात अनेक प्रश्न असतात व ह्या संदर्भात काही निश्चित नैतिक भूमिका घेऊन कादंबरीकाराने भाषिक कृति केलेली असते, त्यानुसार आशयसूत्र निवडलेले असते." ( टीकास्वयंवर--पृ २४२ ). शिवाय कादंबरीच्या प्रमोशन मध्ये नेमाडेंनी "स्टार-माझा" वर जी प्रदीर्घ मुलाखत दिली, त्यातही म्हटले होते की हिंदू धर्म ब्राह्मणांनी बिघडवला. त्यामुळे जे लिहिले आहे ते पूर्ण समजून-उमजून , निश्चित नैतिक भूमिकेतूनच लिहिलेले आहे. कादंबरीत काही एक "निश्चित नैतिक भूमिका" असते, असे नेमाडेंचे म्हणणे आहे. कादंबरीच्या मलपृष्ठावरच सोयीसाठी ही नैतिक भूमिका दिलेली आहे ती अशी की हिंदू धर्म निरनिराळे प्रवाह स्वीकारीत गेला , ब्राह्मणांमुळे भ्रष्ट होत गेला व त्यामुळे जीवनात एक समृद्ध अशी अडगळ साचत गेली आहे. हेच थोडेसे वेगळ्या वळणाने सुरुवातीच्या पसायदानाच्या घाटाच्या कवितेने नमूद केलेले आढळते. पण संपूर्ण कादंबरीत शोधूनही ह्याचे प्रत्यय येत नाही. नायकाच्या सान्निध्यात खलनायकी थाटाची ब्राह्मण पात्रे योजलेली नसल्याने ब्राह्मणांनी धर्म बिघडवला व तो कसा हे कादंबरीत सापडत नाही. तसेच नायक कुठल्याही धर्माचा असता तरीही शहरीकरणामुळे व ग्लोबलाइझेशनमुळे सध्याचीच अडगळ बाळगून राहिला असता, असेच अडगळीचे वर्णन आहे. इथे कथानकातून वा कादंबरीच्या निवेदनातून नैतिक भूमिका प्रसृत/ज्ञात होत नाही. आधी लेखकाने ठरविली असेल किंवा एक प्रमोशन म्हणून ती असेल तर वाचकाला पुस्तकात सापडत नाही.
ह्या उलट भैरप्पांच्या "जा ओलांडुनी " मध्ये भूमिका सांगितली आहे की जातींमध्ये सर्वांना ब्राह्मण व्हायची इच्छा दिसते. जर सगळेच मूळ ब्राह्मण असते तर ब्राह्मणात एवढे वेगवेगळे पंथ-उपपंथ का आले असते ? हा निष्कर्ष कथानकातून काढल्या सारखा सबंध कादंबरीभर दरवळत राहतो. मग तो वाचकांपर्यंत नेमका पोचतो. ( ह्याच विषयावर समाजशास्त्रामध्ये अनेक पीएच.डी चे प्रबंध लिहून झाले आहेत.त्यामुळे ह्या निष्कर्षाला एक प्रकारची शास्त्रीय बैठक लाभलेली आहे. त्यामानाने हिंदू धर्मा-मुळे-अडगळ-साचणे ह्या बाबतचा अभ्यास निर्विवादपणे झाला आहे असे ठामपणे म्हणता येत नाही. शिवाय ह्या धार्मिक अभ्यासांना एक संशयाची किनार व्यापून राहते.) भैरप्पांची स्वत:ची जात कोणती किंवा नेमाडेंची कोणती हे प्रश्न कलाकृतीबाह्य ठरतात व "न्यू क्रिटिसिझम"च्या निकषांमुळे गौणच ठरतात. त्यामुळे आपल्याला तशी तुलना करता येत नाही. फक्त जाणवते की एकीत ( भैरप्पांच्या) निश्चित नैतिक भूमिका दिसते तर दुसरीत ( नेमाडेंच्या ), ती गाजावाजा केलेला असला तरी दिसत नाही.
नेमाडे हिंदू धर्माबाबत कादंबरीत सखोल चिंतन करीत नसले तरी भैरप्पा मात्र एकूण धर्म-रीतींबद्दल ( उदा:देवपूजा, हवन या बाबत ) फार मार्मिक विचार ( पृ.३५६) देतात: "जेव्हा देवपूजेला सुरुवात झाली तेव्हापासूनच आमच्या समाजाच्या पतनाला सुरुवात झाली असं माझं म्हणणं आहे. फक्त हिंदू देव नव्हेत. लोकांमध्ये फूट पाडणारी अतिशय वाईट शक्ती म्हणजे देव. अल्ला श्रेष्ठ की ख्रिस्ताचा बाप मोठा म्हणून किती रक्तपात झाला ! अल्ला मोठा की राम मोठा या मतभेदात भारतात किती जण मेले ! यांच्यात तरी विष्णू आणि शंकराच्या नावानं कमी भांडणं होतात का ? ही चूक देवाची नव्हे, लोकांची, असंही कुणी समर्थन करील. गेली चार-पाच हजार वर्ष लोक आपल्या नावाचा गैरवापर करताहेत हे त्या खर्‍या देवाला समजायला पाहिजे की नाही ? मतधर्म--देव वगैरे म्हणजे शुद्ध मूर्खपणा आहे.....पण हे हवन म्हणजे पूजा नव्हे...माणसाच्या आध्यात्मिक तृप्तीसाठी किंवा वाढीसाठी एक ना एक प्रतीक हवं. मला हे अत्युत्तम वाटलं. सगळं जाळून भस्म करून शुद्ध करण्याचा यामागचा सांकेतिक अर्थही मोठा आहे....माणूस फक्त माणूस असला तर तेवढं पुरेसं नाही का ?" नव्या युगात अगदी निरोगी सकारात्मक हा विचार फारच मोहक आहे.
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

रविवार, १४ नोव्हेंबर, २०१०

भैरप्पा ते नेमाडे:--१
एक तौलनिक अभ्यास:
दोन अपत्ये एकमेकात भांडतांना नेहमी म्हणतात की तुम्ही आमच्यात तुलना करू नका. आम्हाला दोघांनाही स्वतंत्रपणे स्वीकारा. आता हे साहित्यात कलाकृतींना लागू होते की नाही ह्याची प्रथम तरी कल्पना येत नाही, पण कळत नकळत आपण तुलना मात्र हमेश करीतच असतो. जसे काही ( उदा: प्रभा गणोरकर ) म्हणतील की नेमाडेंची "हिंदू" ही शतकातली अनन्यसाधारण कादंबरी आहे. तर सामान्य वाचकाला हा प्रत्यय समजा नाही आला, तर म्हणावे लागेल की "ह्यावेळेस नेमाडेंची भट्टी काही जमलेली दिसत नाही." दोन कलाकृती क्वचितच एका विषयावर असतात, एका भाषेत, व एका समयी ! पण काय आश्चर्य, १९८९ साली साहित्य अकादेमीने प्रसिद्ध केलेली एस.एल.भैरप्पा ह्यांची "दाटू" किंवा मराठी भाषांतरित "जा ओलांडुनी" ही कादंबरी व नेमाडेंची "हिंदू" ही एकाच विषयावर ( हिंदू व जातीयता) आहे. भैरप्पांच्या कादंबरीला साहित्य अकादेमीचा पुरस्कार आधीच मिळाला आहे, तर नेमाडेंच्या "हिंदू" ला अजून मिळायचा आहे. दोन्ही कादंबर्‍यांचा काळही साधारण पणे एकच म्हणता येईल. फक्त नेमाडेंची कादंबरी काही कारणाने जरा उशीरा प्रसिद्ध होतेय, पण ते म्हणतात तसे ३५ वर्षांपासून लिहिण्यात होती. म्हणजे दोन्हीही एक कालीयच !
तुलना करायचे दुसरे एक प्रयोजन, श्री. हरिश्चंद्र थोरात, हे आहेत. ह्यांचे नुकतेच "कादंबरीविषयी" हे समीक्षा पुस्तक आलेले आहे. त्यात ते निरनिराळ्या कादंबर्‍यांची समीक्षा करत कोणती कादंबरी ग्रेट आहे ते सांगतात. तसेच त्यांचा विद्यापीठातला हुद्दा ( तौलनिक साहित्याचा अभ्यास ) ही सांगतो की असे तुलना करणे रास्त असावे. ( त्यांच्या घराखाली म्हणतात एक "विठ्ठल मंदिर" नावाचा बार आहे, त्याची आणि खरोखरच्या विठ्ठल-मंदिराची मात्र आपण तुलना करू नये !).
तुलनेचे प्रयोजन अर्थातच दोन कादंबर्‍यात डावे-उजवे करणे होऊ शकत नाही, पण एकाच विषयावर दोन भिन्न प्रकृतिधर्माचे लेखक कशी वेगवेगळी हाताळणी करतात हे पाहण्याचे आहे. त्यातली कुठली हाताळणी भावते ते वाचकाला ठरवणे सोयीचे जावे त्यासाठी ही तुलना !

शनिवार, ६ नोव्हेंबर, २०१०

नेमाडेंचा लैंगिक शिक्षणाचा तास !
"हिंदू" मध्ये नेमाडेंचे अजब लैंगिक आचरण दिसून येते. आता मराठीत आपले काही सर्वमान्य समज आहेत. जसे टेबल हा तो टेबल असतो, तर खुर्ची ही ती खुर्ची असते. आता जुन्या भाषेत मेज म्हटले तर ते मेज होते. म्हणजे एकच वस्तु तीनही लिंग धारण करते. आपण शहरी असू तर अमराठी भाषिक मराठीची कशी लैंगिक वाट लावतात ते रोजच आजूबाजूला वा दूरदर्शनवर पाहतोच व सहनही करतो. पण नेमाडे असे का करत असतील ? पहा:
(पृ.५४): --तिथेसुद्धा तडा गेली. (साधारणांना तडा जातो )
(पृ.३१):..तेव्हा रोज रस्त्यावर ट्रक लावला...(पृ.५६):ट्रक प्रखर हेडलाईट टाकत आली...( आता नेमाडे चढतील तो ट्रक नपुसकी निघो)
(पृ.१७६): एक तीळ सात जणांनी खाल्ली ( साधारण लोक तो तीळ खातात )
(पृ.४१५):..स्प्रिंग वेगानं उसळला...(आपली स्प्रिंग दिली नाही तर ढीली होते )
पुस्तकातली बोली भाषा आजकाल कुठे ऐकू येत नाही. मराठीच आधी कमी ऐकू येते. त्यामुळे आधीच वाचकाची पाचावर असते. त्यात ६०३ पानं. मग नेमाडेंना लक्ष वेधून घ्यायला असेच काही लैंगिक प्रयत्न करायला हवेत. घ्यायचे आहे असे लैंगिक शिक्षण ?
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

मंगळवार, २ नोव्हेंबर, २०१०

नेमाने नेमाडे--२०
मी बोलेन ते प्रमाण !
नेमाडेंचे एक लाडके प्रतिपादन आहे की लोक प्रमाण भाषा होऊ देतात, ही खरं तर बोली भाषा बोलणार्‍यांची सहनशीलता आहे. त्यामुळे ते बोली भाषेत लिहिण्याचे खंदे समर्थक आहेत. म्हणूनच त्यांच्या सर्व कादंबर्‍या अशा स्व-रचित बोली भाषेत असतात.( नशीब आपले की त्यांचे टीका वाङमय तरी प्रमाण भाषेतच असते.). त्यांचा भाषेच्या बोलपणावर इतका दाट भर आहे की कोणी अलंकारयुक्त भाषा वापरली की नसता अर्थ अलंकाराद्वारे आणण्याचा प्रयत्न केल्याबद्दल ते त्या लेखकावर तुटून पडतात. बरे आजकाल भाषाशास्त्रावरचे पढित व ब्राह्मण नसलेले विद्वान फारसे कोणी शिल्लक नसल्याने किंवा उगाच कुठे खोड काढा ह्या भीतीने , ह्या प्रांतात त्यांना रान मोकळे आहे.
एक सामान्य वाचक म्हणून थोडा विचार करून पहा. सर्व कादंबरी एकाच बोली भाषेत ते का लिहीत नाहीत ? नायकाची स्वगते कधी बोली भाषेत तर त्याची ठाम निष्कर्शे, नैतिक भूमिका, ह्या अतिशय भारदस्त अशा प्रमाण भाषेत असतात. "हिंदू"मध्ये तर हे दोलायमान होण्याचे प्रमाण फारच सारखे होत राहते. आशयसूत्राला अनुसरून भाषेचा आवाका मी निवडतो, असे ते म्हणतात. आता कादंबरीचे कथानक असे आहे की त्याच्या निवेदनाला कुठलीही भाषा चालावी. कारण नायक शिक्षित आहे, शहरी आहे, तर बर्‍याच वेळा तो भूतकाळातले बोलत राहतो व बोलीभाषा निवडतो. हे शैली साठी का काही निश्चित हेतु धरून हे सहज समजू शकते. नेमाडेंची प्रमाण भाषेवरची हुकुमत निर्विवादच आहे. त्यांच्या लोकमान्यतेत ह्या प्रमाण भाषेवरच्या प्राबल्याचे खासे महत्व आहे. आणि हे ते निश्चितच जाणत असावेत. त्यामुळेच त्यांनी प्रमाण भाषा ज्यास्त करून वापरणे साहजिकच ठरते.(कोणी अभ्यास केलाच तर प्रमाण भाषा कमीतकमी ७० टक्के भरेल.). ते खपाच्या दृष्टीनेही सोईचे आहे. तसेच बोली भाषेबद्दल रोमॅंटिक कल्पना बाळगणे चांगले दिसणारे असले तरी वाचकाला ते अंगवळणी न पडणारे आहे. त्यामुळेच १५ हजार खपलेल्या प्रतींचा आढावा घेतला तर बहुतांशी वाचक हे पहिल्या शंभर पानातच अडकलेले व मग तिथून पुढे न धकलेले आढळून येईल. ( अर्थात ज्यास्त लोकांनी वाचले तर तो काही महान साहित्याचा मापदंड होत नाही. कोणीच वाचत नाही अशा पुस्तकांना साहित्य अकादेमीचे महानतेचे पुरस्कार मिळत असतातच.). पण रॉयल्टी ही खपावरच असल्यामुळे समृद्ध अडगळीसाठी हे धोरण बरे पडते.
शिव्यांचा वापर करताना त्या भावनेची तीव्रता दर्शवितात हा हातखंडा होरा असतो. पण भावना वा प्रतिक्रिया प्रमाण भाषिकांना दाखविता येतात व बोली भाषकांना शिव्याच वापराव्या लागतात असा दंडक न्यायाचा नाही. प्रमाण भाषकांनी अलंकारिक भाषा वापरली तर ते भिकार साहित्य व बोली भाषकांनी शिव्या वापरल्या तर ते महान असा कायदा हा "हम करेसो कायदा" होईल. इथे बोली भाषकांनी शिव्या न वापरता का थोडे सहनशील होऊ नये ? शिव्यांनी पटकन लक्ष वेधल्या जाते हा परत किफायतीचाच मार्ग होतो.
मी बोलेन ते प्रमाण हा ह्यावरचा खासा तोडगा नेमाडे काढतात.
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

बुधवार, २७ ऑक्टोबर, २०१०

सृजन-वेग
प्रगतीची झलक दाखवताना एका पुस्तकात बिल गेटस म्हणतात की दररोज प्रसिद्ध होणारी पुस्तके जर उभी लावली ( म्हणजे त्यांची जाडी मोजली, इंच-मैलात, ) तर इंग्रजी ज्ञानाचा वेग दर ताशी १०० ते १२० मैल भरेल. ह्यालाच मराठी ज्ञानाची तुलना केली तर हा मराठी पुस्तकांचा वेग ताशी ३०-४० मैल भरेल. पुस्तके ही सृजनशक्तीवर चालतात व त्यांचा हा प्रचंड वेग पाहता थक्क व्हायला होते की माणसे किती प्रचंड लिहीत असतात.
सर्जनशीलतेच्या शास्त्रात झटकन लिहून होते ते निर्मितीच्या झटक्यासरशी व ते सहजस्फूर्त असल्याने बर्‍यापैकी असू शकते असे मानतात. म्हणजे सहज रात्री अपरात्री कवीला कविता सुचली, दिसली तर ती त्याने आठवडाभर "र"ला "र", "ट"ला"ट" जोडीत केलेल्या कवितेपेक्षा ज्यास्त चांगली समजतात. कवींना, लेखकांना कधी कधी महिनोन महिने काहीच सुचत नाही. ह्या अवस्थेला "रायटर्स ब्लॉक" किंवा "लेखनाचा बांध" म्हणतात. ह्या वेळच्या त्यांच्या काहीच न सुचण्याला अर्थातच चांगले म्हणता येत नाही.
आता नेमाडेंनी त्यांची पहिली कादंबरी "कोसला" ही वयाच्या पंचविसाव्या वर्षी अवघ्या आठ दिवसात लिहिली म्हणतात. म्हणजे सर्जनाचा वेग किती प्रचंड असेल नाही का ? जर ही कादंबरी ३०० पानांची व प्रत्येक पानावर २५० शब्द धरले तर ७५,००० शब्द आठ दिवसात म्हणजे दिवसाकाठी ९३७५ शब्द होतात. त्याउलट "हिंदू" ही कादंबरी ६०३ पानांची व प्रत्येक पानावर २८० शब्द धरले तर एकूण १,६८,८४० शब्दांची होते. ही कादंबरी नेमाडे म्हणे ३५ वर्षांपासून लिहीत होते. तर हा वेग मोजला तर भरेल दर दिवशी १३.२ शब्द. अवघे १३ शब्द ! हे काय सृजन म्हणायचे का सृजनाचा वांधा ? उन्हाळ्यात कधी कधी आपल्याला उन्हाळी लागते तेव्हा छप्पन्न वेळा बाथरूमला जाऊन अवघे काही थेंब येतात व प्रचंड दाह होतो. ही तर नेमाडेंची सृजन-उन्हाळीच म्हणायची ! फरक इतकाच की उन्हाळी त्यांना व दाह वाचकाला अशी परिस्थिती !
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

मंगळवार, १९ ऑक्टोबर, २०१०

नेमाने नेमाडे--१०
देशीवादाचा वृद्धाश्रम
एकेकाळी नेमाडे देशीवादासाठी फार प्रसिद्ध होते. देशीवाद तसा दिसायलाही खूप लोभस असे. पण आज तो कुठे आहे ?
वृद्धाश्रमात जशा सर्वांच्याच कहाण्या साधारण एकसारख्याच असतात तसेच काहीसे नेमाडेंच्या देशीवादाचे झाले आहे.
नेमाडे स्वत: आजकाल भाषणातून मराठीच्या काळजीपायी मुलांना फक्त मराठी माध्यमांच्या शाळातच पाठवा असे म्हणतात. पण ह्यांचे स्वत:चे शिक्षण इंग्रजी ह्या विषयाचेच झाले आहे. देशीवादासंबंधी टीकास्वयंवरात (पृ.१२२) वर ते म्हणाले होते :"आता आपल्या स्वत:च्या भाषासमूहाबाहेर आपण जे जे भाषिक वर्तन करतो त्याला सामान्य दर्जापलीकडे काही महत्व नसते." त्यानंतर ते स्वत:च्या पुस्तकांची इंग्रजीत भाषांतरे करून घेणार्‍यांची खिल्ली उडवतात. पण प्रत्यक्षात साहित्य अकादेमीच्या पुरस्कारांसाठी त्यांना आपल्याच पुस्तकांची भाषांतरे करून घेणे क्रमप्राप्त ठरते. आता हे वृद्धाश्रमातल्या कहाण्यांसारखेच झाले की !
नेमाडेंच्या "हिंदू" कादंबरीची वाखाणणी करण्यात सध्या एक नवी टूम चालू आहे. हरिश्चंद्र थोरात हे एक कार्यशाळा घेऊन हे सिद्ध करू पाहत आहेत की मिखाइल बख्तिन नावाच्या रशियन समीक्षकाच्या "द डायलॉगिक इमॅजिनेशन" ह्या पुस्तकात दिलेल्या निकषांवरून "हिंदू" ही कादंबरी ही अनन्यसाधारण ठरते. ( म्हणजे हिला मोठ्ठा अकादेमीचा सन्मान द्यावा !). आता स्वत: नेमाडे टीकास्वयंवरात म्हणून गेले आहेत ( पृ.१२३) की "आपण निर्माण केलेली प्रमाणके सोडून इतरांच्या प्रमाणकांचा स्वीकार करता कामा नये". शिवाय मालशे म्हणतात तसे बख्तिन हा काही हिंदू गृहस्थ नव्हता, त्याची प्रमाणके गृहित धरायला.
जे नेमाडे म्हणाले की "पाश्चात्य वेशभूषेचे अनुकरण करणार्‍या पुरोगामी आंतरराष्ट्रीय जीवनपद्धती जगणार्‍या शिक्षितांनी मात्र हा सर्वात सौंदर्यशील जुळणभाग परसंस्कृतीच्या दबावामुळे लज्जास्पद ठरवला" , त्यांना कधी कुणी धोतर कुडत्यात पाहिले आहे काय ? आजकाल तर ते सहा महिने कॅनडा व सहा महिने दहिसर असे रहात असतात. आता ह्यांची तिथली नातवंडे कुठल्या माध्यमाच्या शाळेत जात असतील ते सहजी कल्पना करण्यासारखे आहे. शिवाय "हिंदू" त ते गा‍र्‍हाणे घालतात की तिथे व्हिसा संपला की हाकलून देतात, हे काय बरे आहे का ? तसेच खेडयात राहण्याच्या देशी भावनेचे . स्वत: ते शहरात रहात आले आहेत. पण गुण गायचे खेडयात राहण्याचे.
"हिंदू" कादंबरीत देशीवादाच्या तत्वाविरुद्ध किती तरी उदाहरणे बघायला मिळतात. ज्या गालिबच्या शेरशायरीचे नेमाडेंना खूप अप्रूप आहे, ते काय मराठीत आहेत काय ? तसेच हिंदी सिनेमांच्या गीतांचे उदधृत करणे. मराठी सिनेमात काय गाणी नसतात काय ? तसेच सध्या इंग्रजी कादंबर्‍यात प्रचलित असलेल्या एका युगतीचे. उदाहरणार्थ मायकेल क्रिष्टन ह्यांच्या कादंबर्‍यात कथानकाच्या अनुरूपतेने खूप तांत्रिक माहीती वाचकांना दिलेली असते. जसे जुरासिक पार्क वगैरे. आता हा परदेशीच कल म्हणायचा. मग "हिंदू" त जी भरताड भरती अशी केलीय तिला काय म्हणायचे ? जसे ऍंथ्रॉपॉलॉजीचा एक किस्सा की माणूस आडव्याचा उभा झाला म्हणून भाषेचा जन्म झाला व तो जर पुन: चार हातापायावर रांगायला लागला तर भाषा नष्टही होईल. तसेच वाघ नष्ट होण्याची गोष्ट. गरम तव्याचा जोक, बोबड्या प्राध्यापकाचे बोलणे, स्त्री-दाक्षिण्य हे दक्षिणेच्या लोकांनी आणलेले वैशिष्ट्य त्याचा किस्सा, काही पोरकट कविता, नामांतराचा इतिहासात जमा झालेला सविस्तर भाग, विद्यापीठातले भ्रष्टाचाराचे रडगाणे, वगैरे. म्हणजे पहा, स्वत:च अशी अडगळ पेरायची व छदमीपणे रडायचे कशावर तर "जगण्याची समृद्ध अडगळ". ती ही "हिंदू" धर्मामुळे !
देशीवाद जसा स्वत: नेमाडेंनीच अशा अडगळीच्या वृद्धाश्रमात लोटला आहे तशीच ही कादंबरी अडगळीत व वृद्धाश्रमातच आता पहायला मिळेल !
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

गुरुवार, १४ ऑक्टोबर, २०१०

नेमाने नेमाडे---९
स्त्रीवादाचा बुरखा
स्त्रीवादाचा पुळका हे आजकाल एक प्रकारचे "गिव्हन"च असते. स्त्रियांबद्दल धन्योदगार काढणे म्हणूनच एक प्रकारची बांधिलकीच मानावी लागते. हे तोंडदेखलेपण नेमाडे चांगले सांभाळतात जेव्हा ते मोघम म्हणतात की, "स्त्री ही सामाजिक कल्पना आहे का जीवशास्त्रीय ?" पण त्यावरचे उत्तर "हिंदू" त् ते कुठेच देत नाहीत. उलट नीट न्याहाळले तर खालील विधानांवरून त्यांची स्त्रियांकडे पाहण्याची ( किंवा बिलकुल न पाहण्य़ाची ) दृष्टी पारंपारिक पुरुषी असल्याचेच दिसून येईल:
(पृ.२६):"मुक्त ह्या संस्कृत शब्दाऐवजी आपला देशी शब्द मोकाटच ह्या संदर्भात वापरला पाहिजे. बस. तेवढ एक झालं की आपल्या मुली सुधारल्याच समज. लैंगिकदृष्ट्या लहानपणापासून ह्या बायका मोकाट असल्यानं पुढे काही भीड राहत नाही. व्यभिचाराचीही शक्यता ह्यात गृहित धरली जाते. प्रत्यक्षात लैंगिक अतिचार अशाच बाया करतात."
(पृ.१५७):"...अरे, पण सुईच्या मर्जीशिवाय दोरा जाईल काय ? "
(पृ.२०६):"..ह्या मारवाड्याच्या सारख्या दिसणार्‍या पोरांना गावातल्या शेतकर्‍यांच्या कामानं रंजलेल्या बायका, रे, इकडे ये बरं. तू कोणाचा ? असं विचारायच्या, मग त्यानं बापाचं नाव सांगितलं, की सगळ्य़ा पोट धरधरून हसायच्या. धनमत्सर. "
(पृ.२५७):"गाय आणि बायको---संध्याकाळशी दावणीला पाह्यजे."
(पृ.२६३):"आता दोन राण्याही गेल्या, त्यामुळे हल्ली एकाच बायकोत आवडती आणि नावडती दोघी आलटून पालटून पाहावं लागतं."
(पृ.२८०):"...मला पहा अन फुलं वाहा....लभान्यांनो, सवतीची फुगडी अन फेडा एकमेकीची लुगडी."
(पृ.३४०):" कि अबला वरतारे दाबली नं खाले भलत्याची नार."
(पृ.३४६):"...हे पहा वहिनी, कुलूप एकीकडे अन किल्ली एकीकडे असं चालतं का ?"
(पृ.३९०):"स्त्रीवादाविरुद्ध आम्ही सगळ्यांनी चर्चासत्राच्या आधीच नीट तयारी केली होती" हे वाक्य केळ्यांवरून सुचणे हे म्हणजे अश्लीलतेची कमालच.
(पृ.४२२):"..का वं ए नागरगोंडी, लई छाती काढून दबोयती का आम्हले ?....उंदरं खाता साल्या, त्याच्यागुनं पाहा कशा घागरी याहिच्या.." ( स्त्रीपात्रे अशीच ठेवल्यामुळे लेखकाला सर्वत्र पहा कशा इरसाल शिव्या वाहता आल्या आहेत.).
(पृ.४३८):"...गुरुची शिष्या गुरूला फळली..."
(पृ.४५२):"...दक्षिणेतूनच स्त्रीदाक्षिण्य हा शब्द आला असावा..."
(पृ.५३८.):"...बायकोला मी सोडून दुसर्‍यापासून मूल नाही होऊ शकत ?...ही नैतिकता भारतीयांच्या केंद्रस्थानी यायला पाहिजे."
कादंबरीचा नायक ब्रह्मचारी दाखविल्यामुळे एक स्त्रीपात्र वाया घालवले आहे. शिवाय जेव्हा तो म्हातारा होतो तेव्हा मुलाशी होणारा बेबनाव लेखकाला महत्वाचा वाटतो पण म्हातारीच्या जाणीवा दाखवण्याचे कटाक्षाने टाळण्यात आले आहे. खंडेरावाच्या लहानपणी बापाची व्यक्तिरेखा रंगविली आहे, पोराच्या डोळ्याच्या जखमेची कणव दाखविली आहे, पण आईचे कोणतेही थोरपण चितारलेले नाही. हे विशेष जाणवण्याचे कारण, लेखक साहित्यिकात फक्त "श्यामची आई" वाल्या साने गुरुजींनाच मानतो, तरीही आईचे थोरपण चितारीत नाही. कादंबरीत स्वत:ची ओळख पटवण्यासाठी वाचकाला स्त्री पात्रेच उपलब्ध नसतील( जी पात्रे आहेत ती लभान्या, रांड, अशा,किंवा महानुभावी आत्यासारख्या संन्याशीण ) तर स्त्रीवाद कसा वाखाणायचा ? अखेरच्या घटकेला दुसर्‍या आत्येवरचा अन्याय दाखवलाय पण नायक त्याचे निराकरण करीत नाही, पारंपारिकतेने म्हणतो, बायकांनी सहनशील रहावे.
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

शुक्रवार, ८ ऑक्टोबर, २०१०

नेमाने नेमाडे---५
वारकर्‍यांवर वार !
नेमाडेंना तुकारामाबद्दल आदर. मौखिक परंपरा, साधी राहणी, एकमेकांच्या पाया पडणे, वारी, ह्यासाठी त्यांना वारकर्‍यांबद्दल प्रेम असावे, असे त्यांच्या आत्तापर्यंतच्या लिखाणावरून वाटते. पण हे काय ?
"हिंदू त (पृ.४४०):वर : पैठण. वारकरी पंथाबद्दल एकच मिनिटात ओळख---कसे जातिभेद मिटवले वगैरे. मुसलमान तर सोडाच, आपापल्या गावातल्या महारा-मांगानासुद्धा वारकर्‍यांनी जवळ घेतले नाही. सामावून घेणं आणखी दूरच. विठ्ठ्लाच्या चरणीं सगळे एक ? पंढरपूरात आषाढीला चोवीस सवर्णांच्या पालख्या गेल्यावर अजामेळ मांगाची शेवटून...एकादशीला मिरची, रताळं, पेरू, पपया, शेंगदाणे, खजूर, बटाटा, साबुदाणा, असले म्लेंछ यावनी पदार्थ कसे काय चालतात ? "
महाराष्ट्रात लाखांच्या संख्येने वारी करणारा हा केवढा समानतेचा आदर्श असणारा हा संप्रदाय. पण स्वत: महानुभावी पंथाचे असलेल्या नेमाडेंना त्यात वैगुण्यच दिसते. ते सगळ्यांनाच शिव्या देतात असा आव आणतात. मग पुस्तकात कुठेच नायक असलेल्या खंडेरावाच्या महानुभाव पंथाचे काही विश्लेषण का नाही ? उलट आत्या महानुभाव पंथाची संन्याशीण असते तिचे किती उदात्त भव्य चित्रण .मुसलमानांबद्दल का मूग गिळून गप्प ? नायक तर पाकीस्तानात असतो.त्याला भरपूर वाव होता.
ह्या नेमाने शिव्या घालण्याच्याच कसबाला दाद म्हणून, नेमाने नेमाडे असा हा प्रतिसाद !
arunbhalerao67@gmail.com

गुरुवार, ७ ऑक्टोबर, २०१०

प्रती ज्ञानेश्वर नेमाडे,--ज्ञानेश्वराला काय दाखवतात ?
"हिंदू" ह्या प्रचंड खपलेल्या भालचंद्र नेमाडे ह्यांच्या कादंबरीतले पृ.१५६ वरचे हे भाष्य पहा:
"एक बुला वेसकर. वेशीखालच्या देवडीत बसलेला. हा ह्याच नावानं विख्यात होण्याचं कारण आजूबाजूला कोणी नाही, हे चाणाक्षपणे पाहून हा एकदम त्याच्या धोतरातली बुल्लीच मुठीत धरून आम्हा पोरांना दाखवायचा. पुन्हा धोतर खाली टाकून साळसूद चेहर्‍यानं काहीच झालं नाही, किंवा काहीच केलं नाही, असं दाखवायचा. हे कोणाला सांगायचं तरी कसं ? याचा अर्थ आपल्याला तेव्हा लागत नव्हता. आता लागतो: सवर्ण हिंदू -अस्पृश्य संबंधाचा तो दृष्टांत होता, कव्हणी एकु कुरवंडी करीत सांता कुरघोडी करी त्या वेसकरीयाचा दृष्टांत. जैसे फ्राइडचा सिद्धांत जातीयतेत मोडून सांगितल्यास जैसे होईल तैसे. किंबहुना ज्ञानेश्वर : ऐसा शिवमुष्टिगुंडु । घेउनु ठाके ॥ अस्पृश्यता एक हजार वर्षांपासून आहेच, तेव्हापासूनचे दाब असे वर येतात. "
ही संत ज्ञानेश्वरांची अतिशय हीन पातळीला जाऊन केलेली बदनामी आहे.
"संतसूर्य तुकाराम" कादंबरीत तुकारामाने तरुणपणी दुकानात आलेल्या पोरींच्या हातावर गोळी ठेवण्याच्य़ा मिषाने स्पर्श केला ( व इतर स्त्रिसुलभ आकर्षण दाखवले ) तर केवढा गहजब झाला. संमेलनाध्यक्षपदही गेले आनंद यादवांचे आणि इथे तर लेखक ह्या वेसकराला ज्ञानेश्वरांना हे काय भलतेच दाखवायला लावतोय. व वर परत फ्राइडचा सिद्धांत, दृष्टांत वगैरे. ह्याचा धिक्कारच व्हायला हवा.
कायदेशीर कारवाईही व्हायला हवी.
कादंबरीतले लिखाण हे प्राय: एक ललित लिखाण व काल्पनिक असते. पण नेमाडे कबूलतात की ही आत्मचरित्रपर कादंबरी असून आदर्श अशा "यमुनापर्यटन" टाइप कादंबरीत असते तसे निश्चित नैतिक भूमिका घेऊनच हे चितारलेले आहे. नेमाडे म्हणतात: "व्यक्ती व समाज ह्यांच्या संबंधात अनेक प्रश्न असतात व ह्या संदर्भात काही निश्चित नैतिक भूमिका घेऊन कादंबरीकाराने भाषिक कृति केलेली असते, त्यानुसार आशयसूत्र निवडलेले असते." ( टीकास्वयंवर--पृ २४२ ). शिवाय कादंबरीच्या प्रमोशन मध्ये नेमाडेंनी स्टार माझा वर जी प्रदीर्घ मुलाखत दिली त्यातही म्हटले होते की हिंदू धर्म ब्राह्मणांनी बिघडवला. त्यामुळे जे लिहिले आहे ते पूर्ण समजून-उमजून , निश्चित नैतिक भूमिकेतूनच लिहिलेले आहे. शिवाय फ्राइड व खुद्द ज्ञानेश्वरांच्या काही ओळी उदधृत करून ते असे मांडत आहेत की ही ब्राह्मणांनी केलेल्या अत्याचारावरची ही रास्त प्रतिक्रिया आहे. जसे काही खुद्द ज्ञानेश्वरांच्या ओवीमधूनच हे सिद्ध होते.
ही जाणून-बुजून केलेली चतुराई व बदनामी आहे.ज्ञानेश्वरीच्या अध्याय १३ त ओवी ७१५-७१७ मध्ये विद्या व वय ह्यांच्या उन्मादाने माणुस कसा गर्व करीत छाती काढून चालतो व माझ्यासारखा मोठा कोणी नाही असा शिवभक्तांना असतो तसा गर्व ( शिवमुष्टीगंडु, गुंडु नव्हे) धारण करतो व मग त्याला चांगले बघवत नाही अशा अर्थाच्या ह्या ओव्या मुळात अशा : म्हणे मीं चि येकु आथि । माझा चि घरिं संपत्ति । माझी आचरती रीती । कोण्हासी नाही ॥ नाहिं माझे नि पाडे वाडु । मी चि सर्वज्ञु एकु रूढु । ऐसा शिवमुष्टिगंडु । घेउनु ठाके ॥ व्याधिलेया माणसा । न ये भोगु दाखवुं जैसा । नीके न साहे तैसा । पुढिलाचे ॥ आता ह्य़ात वेसकराने काय दाखवले त्याचा व का दाखवले त्याचा हा कसा काय दृष्टांत होतो.काव्यात दृष्टांत म्हणजे जे निवेदन केले त्याच्या समर्थनार्थ दुसरे तसेच एखादे उदाहरण देणे. इथे हा वेसकर ब्राह्मणांच्या दारासमोर जाऊन काही दाखवीत नाही आहे. शिवाय कोणाही मानसशास्त्रज्ञाला विचारा, अत्याचाराच्या दाबाची प्रतिक्रिया अशी नसते.शाळेत लहान मुले असा व्रात्यपणा करतात तो अर्धवट लैंगिक कुतुहुलातून असतो.
शिवाय ह्या वेडसर वेसकराने धोतर उचलून जे दाखवले ते लेखक म्हणतो तसे "आम्हा पोरांना". त्यात महानुभावी पंथाचे लेवा पाटील नेमाडे व त्यांचे ब्राह्मण नसलेले मित्र आहेत. त्यामुळे हा दाब असलाच तर कुणब्यांच्या विरुद्धचा आहे. ब्राह्मणांच्या किंवा ज्ञानेश्वरांच्या विरुद्धचा अजिबात होत नाही. लेखक हेच पुढे कबूलतो ते असे : "शेतकर्‍यांनी कष्ट करावेत आणि ह्या लोकांनी कणसं खुडून न्यावी ? काय नीतीच्या गोष्टी करता हो. ...शेवटी कुणब्याकडेच खेटे घालतील ना ? " दलित व कुणब्यांमध्ये हे लावून देणेही वाईट व निषेधार्यच आहे. कदाचित दलितांच्या लक्षात ही गोष्ट येईलच.
प्रति-ज्ञानेश्वर नेमाडेंना एकमेवाद्वितीयतेचा गर्व जरूर व्हावा पण ते माउलींचा असा अपमान करू शकत नाहीत.
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com
नेमाने नेमाडे---४
नेमाडेंचा ऐसा शिव्या-मस्त-गंडु । देऊनि ठकवे ॥
कायद्याच्या भाषेत कदाचित शिव्या अश्लील ठरत नसाव्यात. नाही तर नेमाडेंच्या ढीगभर शिव्या "हिंदू"त प्रकाशकांनी छापल्याच नसत्या. ह्या शिव्यांचा एक फायदा असा आहे की आजकाल बहुतेक मराठी लोकांची पोरे इंग्रजी माध्यमातून शिकतात, त्यामुळे त्यांना मराठी शिव्या माहीतच नसतात. इथे एवढया भरपूर शिव्या पाहून, आता मराठीचे कसे होणार, ही काळजीच नको. बहुतेक जणांना ६०३ पानांची कादंबरी वाचताना, त्राण ठेवत, काही काही पाने अशीच ओलांडून जावे लागते. ही एक रण-नीतीच जणु. त्यांच्या सोयीसाठी कुठे कोणत्या शिव्या आहेत, त्याची ही जंत्री पहा:
(पृ.२१):येडझवी माणसं , (पृ.३५):मॉंके लौडे , (पृ.४३): मॉंकी च्यूत, मादरचोद , (पृ.४४):माय घातली, (पृ.७५):मॉंकी च्यूत, दोनदा, (पृ.८८):अल्ला,भगवान,भेनचोद कुछ नहीं मांगता आसपास, (पृ.१०६): फोकनीचे, (पृ.१२९):बहीनझू , (पृ.१३०):तोंड नाही तर काय गांड देता ?,(पृ.१५९):तुझ्या आयला , (पृ.१६५): शाटमारी, भडवीच्या, मायझौ , भोसडीच्या, मायबहीनचा झौ, झवाडी रांड, माह्य़ा ल्योक तुही गांड खाये, फोदीचीनं, बोखार्‍यात उंदीर घुसो, (पृ.१६६): माय झौ, झ्याट मारी, मायझवाळ्या, मायचा भोसळा, गांडूच, (पृ.१६९): वायघोडी, बटके, (पृ.१८१):मादरचोदायहो, गांडीत दंडुका खुपसतात, (पृ.२५३):झवाडते, महात्मा गांधीच्या लवडयाचा, बहीनचा झौ, तोंडाची गांड करतूस, (पृ.२५५):झवनं, (पृ.२७०):झाटयाची, भोसडीचे दोनदा, मायची, (पृ.३२९):लांडयांयची ललोपती, (पृ.३४०):मालक मारवाडी, ब्राह्मण संपादक,ठेवल्या जणुं रांडा हो , (पृ.३७७): ह्या दानपत्रात बदल करेल तेयाचिये माये गाढव झविजे, (पृ.३८७.): झाट्याची भावना, गाढवाला लावा गाढव, (पृ.४०८):मायझू, (पृ.४१९): इच्या मायला, मायझौ, (पृ.४२०):बहीनझौ, रांडायहो, (पृ.४२१): झवाडी, (पृ.४२२): नागरमोंडी, (पृ.४३३): बहीनझू, (पृ.४४०):मायझौ, (पृ.४४६):माजला महार कागदाला गांड पुशी, (पृ.४७२): मारू सवर्णांच्या गांडीवर लाथा हो, आमचा बुद्धाच्या चरणी माथा हो , (पृ.४७६): मायला मागून पुढून मारायले मराठवाड्याची, भडवा, दांडू घुसवल्याशिवाय आदत सुधरत नी त्याच्यावाली, (पृ.५०१):झवाडे युवकयुवती, (पृ.५१२):ढुंगणाचं स्वातंत्र्य, (पृ.५१५): प्राचीन ऋषीमुनींच्या थोरवीचं रहस्य : हस्तमैथुन, स्वस्तमैथुन, मस्तमैथुन, (पृ.५४९):तुम्ही बुद्धिजीवी राहा गांडींना पावडरी न अत्तरं लावून छान छोकीत, (पृ.५५१): पाकीस्तानात लांड्यायची लष्करशाही, (प्रु.५५९): नशीब हे असं गांडू--बैलायच्या गांडी पाहायचं .
म्हणतात की अकादेमीचा पुरस्कार मिळवायचा तर एक प्रत हिंदी, इंग्रजीत भाषांतरित करून द्यावी लागते. ह्या शिव्यांची इंग्रजीतली रूपं पहायला काय मजा येईल !
रूपनिर्मितीसाठी म्हणतात बोली भाषेतल्या शिव्याही लिहिणे आवश्यक असते. आता बनी रांड कोणालाही शिव्या घालू शकते. तिने म्हणजे पर्यायाने नेमाड्यांनी " महात्मा गांधीच्या लवड्याचा " असे म्हणणे हे पक्षपाताचे आहे. इतर सामान्य वाचक, कोणाला शिव्या घालू शकत नाही आणि नेमाडे किंवा रांड मात्र...
नेमाडे म्हणतात तसे (पृ.५०५): हागणार्‍याला लाज येत नाही, पाहणार्‍याला लाज येते, तसे आपणच लाजायचे झाले ! ज्यांना शिव्यांचा गंड आहे त्यांना घेऊ दे पुरस्कार !
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

मंगळवार, ५ ऑक्टोबर, २०१०

नेमाने नेमाडे--३
राष्ट्रपित्याशी पंगा !
आपल्याच बापाला शिव्या घालायच्या म्हणजे प्रचंड धैर्य लागते. तशी जिगर लागते. पण एकदा बापालाच घाणेरड्या शिव्या हासडल्या की मग कोणी आपल्या वाटेला धजत नाही. मग महात्मा गांधी भले राष्ट्राचे पिता असले तर त्याचे काय हो ?
पृ.२५३, हिंदू मध्ये हे पहा :
"शांतता चिरणारा बनी रांड हिचा कोळीवाडयातून धारदार आवाज...पन तू कोनता सत्वाचा हायेस महात्मा गांधीच्या लवडयाचा ते पाहतेच मी बी, तुह्या बहीनचा झौ...तोंडाची गांड करतूस..."
साहित्यिकांना रांडेचे अप्रूप असणे समजू शकते ( कारण बहुतेकांच्या धर्मपत्न्या सोडून गेलेल्या असतात ). पण हे पात्र काही "ब्राह्मणांनी हिंदु धर्म बिघडवला" ह्या मध्यवर्ती "निश्चित नैतिक’ भूमिकेशी फारसे जवळचे नाही. शिवाय कायम हरिजनांचा कैवार घेणारे महात्मा गांधी काही लेवा पाटिलांच्या विरोधातले नव्हते. बरे एखाद्या रांडेने पैसे न देणार्‍या कादंबरीकाराला अशा शिव्या हासडल्या तर ते क्षम्य करता येईल. पण तिने डायरेक्ट महात्मा गांधीलाच हात लावावा हे असंभव व अर्वाच्य !
महात्मा गांधींवर अनेकांनी टीका केलेली आहे. पण ही अगदी खालच्या पातळीची तळ गाठते.
महात्मा गांधींचे चित्र असलेला साहित्य अकादेमीचा पुरस्कार घ्यायला आता नेमाडे मोकळे आहेत !
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

सोमवार, ४ ऑक्टोबर, २०१०

समर्थ कादंबरीकार नेमाडे,---रामदासांचा सन्मान करण्यात असमर्थ !
"हिंदू" ही नुकतीच प्रचंड खपाची समर्थ कादंबरी लिहिणारे भालचंद्र नेमाडे, समर्थ रामदासांची कशी ससेहोलपट करतात, हे पृ.४५० वर पहा:
"रामदास स्वामींच्या मंडपात राहून गेलेल्या बायकोच्या दु:खावर फार सुंदर कविता होईल नाही ? वानखेडे म्हणाला, सुंदर ? तिकडे कवळी पोरगी का बोडकी ठेवली जन्मभर का मारली ---आणि तुला सुंदर कविता लिहायचीय ? त्यापेक्षा ही उदध्वस्त बाई हातात वहाण घेऊन याला शोधत शिवथरकडे चाललीय अशी कविता---त्यापेक्षा श्लोकच का नाही लिहीत---जनाचे श्लोक : मनाची नको लाज ठेवू जरी तू । जनाची तरी ठेवी पळपुटया नागडया तू ॥----तू भडव्या सिद्धार्थ गौतमावरच का नाही लिहीत ? ते तं एक पोरगं पण काढून पळालं बायको सोडून....इथे मराठी कवींना रामदासाच्या ह्या बिचारीचं नावसुद्धा माहीत नै..."
असा शिष्टाचार आहे की जनमानसात ज्यांना मान आहे अशा संत व्यक्तींना संबोधताना आदरार्थी वचन, भाषा वापरावी. पण नेमाडेंनी तर "निश्चित नैतिक" भूमिका घेतलेली. मग ते काय नरमतात किंवा नम्रतात ? पळपुट्या काय नागड्या काय ! मनाचे श्लोकला जनाचे श्लोक करणे, तर खूपच मऊ. बरे समर्थ रामदास एकवेळ ब्राह्मण ( व ब्राह्मणांना सध्या वाईट दिवस म्हणून ) एकवेळ जाऊ दिले तरी बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या बौद्ध धर्माचे पुनरुथ्थान केले त्यातल्या गौतम बुद्धाने काय घोडे मारले आहे ? मुलगा झाल्यानंतर बायकोला सोडले, तर स्त्रीवादाचा पुळका आलेल्या नेमाडेंना तो अनादरणीय व नेमाडे बायकोला सोडून गेले, त्यांचा अमेरिकेतला मुलगा त्यांना विचारेनासा झाला तर ती आत्मनिष्ठा व गौरव करणारी बाब ? हा न्याय खासा नेमाडेपंथी असला तरी धिक्कार करण्या योग्यच ! ब्राह्मणांनी व बुद्ध धर्मीयांनी.
नेमाडेंचा शूरपणा पहायचा तर त्यांनी मोहमदा संबंधी असे लिहून दाखवावे व मग आपण त्यांना मानू . तूर्त धिक्कारूच !

अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com
प्रती ज्ञानेश्वर नेमाडे,--ज्ञानेश्वराला काय दाखवतात ?
"हिंदू" ह्या प्रचंड खपलेल्या भालचंद्र नेमाडे ह्यांच्या कादंबरीतले पृ.१५६ वरचे हे भाष्य पहा:
"एक बुला वेसकर. वेशीखालच्या देवडीत बसलेला. हा ह्याच नावानं विख्यात होण्याचं कारण आजूबाजूला कोणी नाही, हे चाणाक्षपणे पाहून हा एकदम त्याच्या धोतरातली बुल्लीच मुठीत धरून आम्हा पोरांना दाखवायचा. पुन्हा धोतर खाली टाकून साळसूद चेहर्‍यानं काहीच झालं नाही, किंवा काहीच केलं नाही, असं दाखवायचा. हे कोणाला सांगायचं तरी कसं ? याचा अर्थ आपल्याला तेव्हा लागत नव्हता. आता लागतो: सवर्ण हिंदू -अस्पृश्य संबंधाचा तो दृष्टांत होता, कव्हणी एकु कुरवंडी करीत सांता कुरघोडी करी त्या वेसकरीयाचा दृष्टांत. जैसे फ्राइडचा सिद्धांत जातीयतेत मोडून सांगितल्यास जैसे होईल तैसे. किंबहुना ज्ञानेश्वर : ऐसा शिवमुष्टिगुंडु । घेउनु ठाके ॥ अस्पृश्यता एक हजार वर्षांपासून आहेच, तेव्हापासूनचे दाब असे वर येतात. "
ही संत ज्ञानेश्वरांची अतिशय हीन पातळीला जाऊन केलेली बदनामी आहे.
"संतसूर्य तुकाराम" कादंबरीत तुकारामाने तरुणपणी दुकानात आलेल्या पोरींच्या हातावर गोळी ठेवण्याच्य़ा मिषाने स्पर्श केला ( व इतर स्त्रिसुलभ आकर्षण दाखवले ) तर केवढा गहजब झाला. संमेलनाध्यक्षपदही गेले आनंद यादवांचे आणि इथे तर लेखक ह्या वेसकराला ज्ञानेश्वरांना हे काय भलतेच दाखवायला लावतोय. व वर परत फ्राइडचा सिद्धांत, दृष्टांत वगैरे. ह्याचा धिक्कारच व्हायला हवा.
कायदेशीर कारवाईही व्हायला हवी.
कादंबरीतले लिखाण हे प्राय: एक ललित लिखाण व काल्पनिक असते. पण नेमाडे कबूलतात की ही आत्मचरित्रपर कादंबरी असून आदर्श अशा "यमुनापर्यटन" टाइप कादंबरीत असते तसे निश्चित नैतिक भूमिका घेऊनच हे चितारलेले आहे. नेमाडे म्हणतात: "व्यक्ती व समाज ह्यांच्या संबंधात अनेक प्रश्न असतात व ह्या संदर्भात काही निश्चित नैतिक भूमिका घेऊन कादंबरीकाराने भाषिक कृति केलेली असते, त्यानुसार आशयसूत्र निवडलेले असते." ( टीकास्वयंवर--पृ २४२ ). शिवाय कादंबरीच्या प्रमोशन मध्ये नेमाडेंनी स्टार माझा वर जी प्रदीर्घ मुलाखत दिली त्यातही म्हटले होते की हिंदू धर्म ब्राह्मणांनी बिघडवला. त्यामुळे जे लिहिले आहे ते पूर्ण समजून-उमजून , निश्चित नैतिक भूमिकेतूनच लिहिलेले आहे. शिवाय फ्राइड व खुद्द ज्ञानेश्वरांच्या काही ओळी उदधृत करून ते असे मांडत आहेत की ही ब्राह्मणांनी केलेल्या अत्याचारावरची ही रास्त प्रतिक्रिया आहे. जसे काही खुद्द ज्ञानेश्वरांच्या ओवीमधूनच हे सिद्ध होते.
ही जाणून-बुजून केलेली चतुराई व बदनामी आहे.ज्ञानेश्वरीच्या अध्याय १३ त ओवी ७१५-७१७ मध्ये विद्या व वय ह्यांच्या उन्मादाने माणुस कसा गर्व करीत छाती काढून चालतो व माझ्यासारखा मोठा कोणी नाही असा शिवभक्तांना असतो तसा गर्व ( शिवमुष्टीगंडु, गुंडु नव्हे) धारण करतो व मग त्याला चांगले बघवत नाही अशा अर्थाच्या ह्या ओव्या मुळात अशा : म्हणे मीं चि येकु आथि । माझा चि घरिं संपत्ति । माझी आचरती रीती । कोण्हासी नाही ॥ नाहिं माझे नि पाडे वाडु । मी चि सर्वज्ञु एकु रूढु । ऐसा शिवमुष्टिगंडु । घेउनु ठाके ॥ व्याधिलेया माणसा । न ये भोगु दाखवुं जैसा । नीके न साहे तैसा । पुढिलाचे ॥ आता ह्य़ात वेसकराने काय दाखवले त्याचा व का दाखवले त्याचा हा कसा काय दृष्टांत होतो.
शिवाय ह्या वेडसर वेसकराने धोतर उचलून जे दाखवले ते लेखक म्हणतो तसे "आम्हा पोरांना". त्यात महानुभावी पंथाचे लेवा पाटील नेमाडे व त्यांचे ब्राह्मण नसलेले मित्र आहेत. त्यामुळे हा दाब असलाच तर कुणब्यांच्या विरुद्धचा आहे. ब्राह्मणांच्या किंवा ज्ञानेश्वरांच्या विरुद्धचा अजिबात होत नाही. लेखक हेच पुढे कबूलतो ते असे : "शेतकर्‍यांनी कष्ट करावेत आणि ह्या लोकांनी कणसं खुडून न्यावी ? काय नीतीच्या गोष्टी करता हो. ...शेवटी कुणब्याकडेच खेटे घालतील ना ? " दलित व कुणब्यांमध्ये हे लावून देणेही वाईट व निषेधार्यच आहे. कदाचित दलितांच्या लक्षात ही गोष्ट येईलच.
प्रति-ज्ञानेश्वर नेमाडेंना एकमेवाद्वितीयतेचा गर्व जरूर व्हावा पण ते माउलींचा असा अपमान करू शकत नाहीत.
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com