गुरुवार, १४ फेब्रुवारी, २०१३

----------------------
ओवेसी कदाचित उदारमतवादी---नेमाडे ?
--------------------------------------------
    श्री.श्रिकांत उमरीकर ह्यांनी भालचंद्र नेमाडे ह्यांची ४० वर्षांपूर्वीची एक कविता देत नेमाडे कसे उस्फुर्तपणे धर्मांध मुस्लिमांना जवाब देत आहेत, त्यांच्या तुमानीत...वगैरे.. त्याची वाखाणणी केली आहे.
    कदाचित श्रेष्ठ विचारवंतांचे हे एक लक्षण असावे की त्यांच्या साहित्यात कायम परस्पर विरोधी विचारांचे दर्शन होत असते. कारण १९८३ साली लिहिलेल्या ( म्हणजे ३० वर्षांपूर्वी ) एका लेखात ते म्हणतात : ( टीकास्वयंवर पृ. १२०, ):
"देशीयतेचा अतिरेक एखाद्या समाजाला आत्मकेंद्रित करून र्‍हासशील करू शकतो, हे आपण मागे अंतर्जननासंबंधीच्या चर्चेत उल्लेखले. जगातल्या इतर समाजापासून विभक्त राहाण्याची प्रवृत्ती त्यामुळे आपोआपच बळावते. एक प्रकारचा वंशाभिमान आणि आत्मसंतुष्ट जीवनव्यवहार अशा समाजात वाढतात. साहजिकच अशा संस्कृती परकीय आक्रमणात नष्ट होण्याची भीती असते. अल्‌-बिरुणीने इसवी सनाच्या दहाव्या शतकाच्या आधी अस्तित्वात असलेल्या ब्राह्मण-केंद्री हिंदू समाजात अशा देशीयतेचा अतिरेक अतिशय स्पष्टपणे वर्णिलेला आहे. तथापि हिंदुस्थानला आपला देश मानून निर्माण झालेल्या, उदारमतवादी मुसलमान वर्ग आणि महानुभाव-वारकरी अशा ब्राह्मण्यविरोधी संप्रदायांनी देशभर उभारलेल्या आत्मशुद्धीपर देशीवादी चळवळींनी हिंदुस्थानातील समाजाचा पाया पुन्हा नव्याने घालून सर्वनाश चुकविला....... "
    नेमाडेंच्या आगामी हिंदूनंतरच्या कादंबरीत कदाचित मुसलमानांच्या उदारमतवादाचे चित्र पहायला मिळणार असावे. कारण हिंदूतला हिरो पाकिस्तानात असूनही त्यात मुसलमानांसंबंधी काहीच ( चांगले वा वाईट ) नव्हते. कदाचित ब्राह्मणांनी हिंदू धर्म बिघडवला हे प्रमुख चित्र दाट करण्यासाठी त्यांनी हे केले असावे. आता मुसलमानांच्या तुमानीचे काही खरे नाही. बा अदब, मुलाहिजा....उदारमतवादी महानुभाव-मुसलमान-युती येत आहे..!
------------------------------------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा