शुक्रवार, ३१ जानेवारी, २०१४

----------------------------
नेमाडेंचे ते बाब्ये, आमचे ते कार्टे ?
------------------
देशीवाद ह्या सदराखाली नेमाडेंनी युनिक फीचर्सच्या मराठी ई-संमेलनात खालील वक्तव्य व लिखाण केले आहे :
"नवीन पिढीला हे जास्त चांगलं कळतं. ही पिढी मोठ्या प्रमाणावर जागतिकीकरणाला सामोरी जातेय. ती आपोआप शिकत असते. उदाहरणार्थ, माझे दोन्ही मुलगे इंजिनियर आहेत. एक मेटरॉलॉजीमधे तर दुसरा इंस्ट्रुमेन्टल सायन्समधे. त्यातला एक लहानपणी कविता करायचा. अशा मुलाने चौथी-पाचवीत मराठीत कविता करणं आणि पुढे इन्स्ट्रुमेन्टल इंजिनियर होऊन नंतर आयआयटीत प्राध्यापक होणं हा बदल जागतिकीकरणामुळे झालेला आहे. नाही तर आधी असा मुलगा मराठीत बी.ए. होऊन कुठेतरी पसायदान वगैरे शिकवत बसला असता. पण ‘दुरितांचे तिमिर जावो’ हे किती दिवस म्हणत बसणार? त्यापेक्षा तिमिरातच काही तरी केलेलं बरं, असं ही नवीन मुलं ठरवतात. नवीन मुलांना आपल्यापेक्षा जास्त जाणीव असते, त्यामुळे काय सोडायला हवं ते ते सोडतात आणि नवीन मार्ग शोधतात."

आपल्याकडे "आपला तो बाब्या आणि दुसर्‍याचं ते कार्ट !" असा वाक्‌प्रचार आहे. त्याप्रमाणे परंपरा मोडणारी ही नेमाडेंची मुले म्हणजे बाब्या व एक्स्प्रेसवे वर शिंग्रोबाचे देऊळ न बांधता थांबण्याची सोय न करणारे जागतिकीकरण करणारी मुले ही कार्टी असेच होते ना ?

नेमाडेंच्या नुसत्या पुरस्कारांच्या संख्येवरून त्यांना वैयक्तिक बाबींचाही अभिमानाने उल्लेख करायचा नक्कीच अधिकार आहे, तो त्यांनी केला हे चांगलेच आहे. पण त्यांची स्वत:ची प्राध्यापकाची परंपरा त्यांनी मोडली हे जसे त्यांना अभिमानाचे वाटते तसेच जुना हायवे सोडून नवीन एक्स्प्रेसवे केला हे का अभिमानाचे वाटू नये. त्यावर नसलेल्या शिंग्रोबाच्या देवळाचे वा थांबा नसल्याचे ( थांबा नाही हा त्यांचा गोड गैरसमज आहे हे कोणीही मधल्या फुडमॉल मध्ये काही गोड खावून अनुभवू शकेल ) त्यांना का सलावे व आपल्या मुलांनीच परंपरा तोडली ह्याचे एवढे कौतुक का वाटावे ?
नेमाडेंची मुले म्हणजे बाब्या व आम्ही सारे कार्टे काय ?
-----------------------------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा